पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#Chatrapati_Sarfoji_raje_bhosale #छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय )

इमेज
#छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय ) छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले तंजावर गादी सांभाळत होते हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांचे दहावे वंशज म्हणजे सर्फोजीराजे भोसले द्वितीय. त्यांनी १७९८ ते १८३२ या काळात गादी सांभाळली. दक्षिण भारतात त्यांनी प्रथम देवनागरी छापखाना काढला. अनेक कलांसहच त्यांना वैद्यक शास्त्राची आवड होती.  ★ औषधांचे उद्यान जडीबुटी लागवड त्यांना केवळ आवड होती असे नव्हे तर त्यांनी आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास केला होता त्यावर एक संकलनात्मक ग्रंथही लिहिला होता. त्यांनी धन्वंतरी महाल उभारला, औषधी उद्यान, औषधी कोठार असे उभारले होते.  औषधी उद्यानात दुर हिमालया पासून कित्येक ठिकाणच्या महत्वपूर्ण वनस्पती गोळा केल्या होत्या. पशु आयुर्वेदावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना ही त्यांनी केली होती.  धन्वंतरी महालात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार चालत असत. हे उपचार केवळ वैद्य व डॉक्टर्स मार्फतच नव्हे तर महाराज स्वतःदेखील नेहमी करत असत. आयुर्वेद, जडीबुटी ,युनानी आणि पाश्चात्य वैद्यकाच्या सहाय्याने डोळ्यांवर उपचार करणे ही त्यांची खासियत होती.  त

#samarbhoomi_umbarkhindit_kartalb_khan_cha_parabhav #समरभूमी_उंबरखिंडीत_कारतलब_खान_चा_पराभव

इमेज
  #समरभूमी_उंबरखिंडीत कारतलब  खान चा पराभव शिवरायांनी उंबर खिंडीत मुगल सरदार कारतलब खान याला चांगलेच झोडपले होते व तो पांढरे निशान हाती घेऊन शरन आला होता. ३०००० मुगल सैन्यानी केवळ १००० मराठा सैन्या समोर शस्त्र टाकली होती. मराठ्यांच्या समोर मुगलांनी शस्त्रे टाकली होती. ३० हजार मुगल सैन्यावर, फक्त १००० मराठा सैन्याने मिळवलेला विजय. शिवरायांनी इथे एक युद्धनीती आखली होती. कारतलब खान हा बोरघाटातुन कोकनात उतरनार होता.  हे शिवरायांना समजताच त्यांनी पेन च्या घाटाखाली सैन्याची एक तुकडीची जमवा जमव केली व ही खबर बहीर्जी नाईक म्हणजेच गुप्तहेर खात्याच्या मदतीने कारतलब खाना पर्यंत पोहचवली. इथे बहीर्जी नाईक यांची ही कामगीरी अतुलनीय आहे.  बोरघाटातुन कोकनात उतरण्याचा हा त्याचा मनसुबा उकळुन पाडण्यासाठी व त्याला कुरवंडा घाटात उतरायला भाग पाडले.  कुरवंडा घाटात ३०,००० मुगल सैन्याला केवळ १००० मराठा सैन्याने गनीमी काव्याने चांगलेच झोडपुन काढले व विजय मीळवला. त्या समई महीला सरदार राय बागन या ही मोहीमेत सामील होत्या. शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्य

107 Shivling installed by Lord Rama in Papanasham temple पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग

इमेज
★ पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग ... तमिलनाडु के तंजौर जिले में स्थित श्री पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग और श्री हनुमान जी द्वारा स्थापित एक शिवलिंग सहित कुल १०८ ऐतिहासिक शिवलिंग हैं.. ये शिवलिंग अतिप्राचीन हैं और भगवान राम के कार्यकाल के हैं..!   मान्यता है कि इन शिवलिंगों की स्थापना भगवान राम द्वारा दैत्यराज रावण के वध से दोषमुक्त होने के लिए किया गया था.  क्योंकि रावण एक ब्राह्मण था इसलिए उसके वध से ब्रम्हहत्या का दोष लग सकता था.  फिर भगवान राम और सीता मैय्या सब अयोध्या आ गये और रामराज्य की शुरुवात हुई.. उसी दिन से दिवाली का त्योहार भी बडी धूमधाम से लोग मनाने लगे.  क्यु की उन सभी के चहिते राजा भगवान राम के आगमन अयोध्या नगरी में हुआ था..!! ★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★ ★ 107 Shivling installed by Lord Rama in Papanasham temple Sri Papanasham temple located in Tanjore district of Tamil Nadu has total 108 historical Shivling including 107 Shivling installed by Lord Rama and one Shivling established by Sri Hanuman ji. These S

May 12, 1666 Chhatrapati Shivaji's historic visit to Agra १२ मे १६६६ छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट

इमेज
१२ मे १६६६ छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट..!! स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.  छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर होते. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला. औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती... अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थ

The second time Surat was looted, Shivaji Maharaj cut off Aurangzeb's nose दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले

इमेज
  दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले...                  सप्टेंबर १६६६ ला शिवाजी महाराज आग्रा कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्या नंतर चा काहि काळ महाराजांनी शांततेत पुर्वी झालेल्या तहा नुसार व्यथित करुन स्वराज्याची घडी आतुन व्यवस्थित बसवली.        शेत सारा पद्धती ठरवली गेली,     सैन्य भरती, किल्ल्यांचा बंदोबस्त व्यवस्थित केला. प्रलंबित निवाडे तंटे मिटवले. व महाराज मिर्झाराजें सोबत अदिलशाहीवर मोगलांकडुन चालुन गेले. अदिलशाही वरील मोहिम आटोपल्यानंतर शिवाजी महाराजांचे विजय पर्व चालू झाले. स.स.१६७० ला शिवाजी महाराजांनी मोगलांना हैराण करुन सोडले. महाराजांना आवर घालण्याचे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न फसत होते. तर महाराज इकडे मोगलांची लांडगेतोड करुन छापे टाकून अनेक किल्ले घेतले. व सुरतेच्या दुसर्‍या लुटिची मोहिम हाती घेतली.  २ ऑक्टो. १६७० रोजी सुरतेत वार्ता येऊन थडकली की, १५००० फौजेसह शिवाजी महाराज सुरतेच्या अलिकडे फक्त २० मैलावर येऊन पोहोचले आहेत.   महाराज सुरतेजवळ आल्याची बातमी ऐकताच शहरातील सर्व व्यापारी व सरकारी अधिकारी यांची एकच पळापळ सुरू झाली.दि. २ ऑ

The third eye of Bahirji Naik Shivaji Maharaj, the spy chief of Swarajya स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा

इमेज
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा १०-१० दिसव अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…! शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो.. मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…! खर सांगतो गड्यानो  हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…! गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास होता की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…! पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक…!

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

इमेज
शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली... ।। इ.स. १६७९ ला आदिलशाही उमराव सिद्धी मसुदखानाने छत्रपती शिवाजी महाराजांची अर्जावे, विनंती करुन, महाराजांना पायघड्या घालून मोगलां पासुन आदिलशाही वाचवण्यासाठी विनंती केली. आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली. ।।             मसुदखान व मोगली सरदार दिलेरखान हे दोघे मिळून इ.स. १६७९  शिवाजी महाराजांवर चालु आले होते. सिद्धी मसुदखानाने सर्जाखानाला शिवाजी महाराजांवर चालुन जाण्यास फर्मावले पण तो त्याच्या आज्ञेत वागेना...  ठरलेल्या तहानुसार सिद्धी मसुदखान वागत नाही हे पाहून दिलेरखान विलक्षण चिडला. तर इकडे सर्जाखान आज्ञेत वागत नाही या मुळे सिद्धी मसुदखान चांगलाच कोंडीत सापडला होता. आता मात्र दिलेरखान विजापुरवर चालुन जाण्यास निघाला..  चंचल व दगाबाज स्वभावाचा मसुदखान चांगलाच अडचणीत आला. मोगलांची समजून काढण्यासाठी शिकंदर आदिलशहा ची बहिण हिचे लग्न औरंगजेबाच्या मुलासोबत लावून देण्यास मसुदखान तयार झाला. त्या नुसार तिला १ जुलै १६७९ रोजी दिल्लीला रवाना केले..   तरीही सिद्धी मसुदखानाच्या गळ्या भोवतीचा फास काय सैल झाला नाही तो दिलेरखानानाने अधिकच आवळला. मोगलांचा अंतस्थ

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

इमेज
स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद            १५ जाने. १६५६ ला जावळी स्वराज्यात आली , शिवाजी महाराजांनी ३० मार्च १६५६ पर्यंत जावळीत मुक्काम करुन जावळीची सर्व व्यवस्था लावली. सैन्य भरती केली रायगड किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हि चालु झाले...  राजगड बांधणीचे काम पुर्वी सुरूच होते. असे सर्व सुरळीत असता सुप्याचे प्रकरण महाराजांसमोर उद्भवले. सुपे परगाण्याची सरहवालदारी शहाजी राजेंनी, संभाजी मोहिते मामांकडे सोपवली होती. ते शहाजीराजेंच्या द्वितीय पत्नी तुकाबाईसाहेब यांचे बंधु होते...  म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते मामांच्या या लाचखोरीच्या कागाळ्या शिवाजी महाराजांच्या कानावर अगोदर येतच होत्या. पण आता प्रकरण भलतेच झाले होते. वरती नमुद केल्या प्रमाणे जावळी १५ जाने. १६५६ स्वराज्यात आली होती..  त्या मुळे आदिलशाही आक्रमक स्वराज्यावर होणार हे नक्कीच होते. अन ते स्वराज्याच्या पूर्वेकडून होणार हे नक्कीच. अन हा सुपे परगाना स्वराज्याच्या पुर्वेला होता..  संभाजी मोहित्यास या ठिकाणी ठेवणे हे किती धोकादायक होते हे महाराजांनी उमगले व संभाजी मोहिते मामास

Naldurg Nal Damayanti fort of Jal Mahal in Osmanabad district उस्मानाबाद जिल्ह्यातील जल महाल चा किल्ला नळदुर्ग नळ दमयंती..

इमेज
उस्मानाबाद जिल्ह्यातील जल महाल चा किल्ला नळदुर्ग नळ दमयंती..    जल महल हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येत ते निळाशार पाणी, त्या अथांग पाण्यात सुंदर असा महाल आणि नैसर्गिक सुंदरता डोळे,  दिपुन जावं अस काहीसं पण आजच्या आधुनिक युगात बांधलेली धरणे सहज फुटून जातात  त्यामुळं जीवहानी आणि कितीतरी नुकसान होते पण जेव्हा या एडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हत्या तेव्हा मात्र आमच्या पूर्वजांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जे काही निर्माण केलं ते बहुदा आधुनी तंत्रज्ञानाला सुद्धा साध्य होणार नाही         आज आपण अश्याच एका भुईकोटाची माहीत घेणार आहोत खरं तर त्याच्या नावातच किल्ल्याच सर्व सार  काही  येत उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हा भुईकोटांच्या विश्वातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला, नावा प्रमाणेच नल आणि दमयंती च्या कथेचा सार त्यात जाणवतो.. किल्ल्याची रचना फार सुरेख, किल्ल्याच्या आता प्रवेश करतांना गोमुखी पद्धतिचे रचना असणारे दरवाजे लागतात मुख्य दरवाज्यावर खूप सुंदर कोरीव काम आढळते..  पहिले दोन दरवाजे पार केल्यानंतर नागमोडी वळण घेऊन किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो या रस्त्याने जातांना किल्ल्याच

Father of indian navy Shivaji Maharaj's ship armor construction and vision शिवाजी महाराजांचे जहाज आरमाराची बांधणी व दूरदृष्टी

इमेज
Father of indian navy Shivaji Maharaj's ship armor construction and vision  शिवाजी महाराजांचे जहाज  महाराजांचे ( जहाज ) आरमाराची बांधणी व दूरदृष्टी...     शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी ताब्यात इ.स. १६५५ - १६५६  च्या सुमारास घेतली तेव्हा रायगड ही स्वराज्यात आला व तेव्हा, शिवाजी महाराजांना आरमाराची बांधणी करणे आवश्यक वाटु लागले... कारण ज्याचे आरमार त्याचा च समुद्र हे शिवाजी महाराजांचे समीकरण अगदि स्पष्ट होते. म्हणून च शिवाजी महाराजांना father of indian navy म्हटले जाते.. पोर्तुगीज दप्तरातील नोंदी प्रमाणे शिवाजी महाराजांनी १६५९ मधे मराठ्यांच्या आरमाराची मुहुर्त मेढ रोवली...  पण आरमार भक्कम कसे करावे शत्रूवर जबर कशी बसले या दृष्टीने शिवरायांनी आरमार उभारले होते. त्याचा प्रत्येय हा आरमाराच्या आज्ञापत्रात येतो, त्यातील प्रमुख बाबी खाली मांडणार आहोत.         शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराब, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार, या प्रकारची जहाजे असल्याचे कृष्णाजी अनंत सभासद सांगतो...  तसेच मल्हाराव होळकर चिटनीस म्हणजे चिटनीस बखर मधे मचवे, बाभोर, तिरकती व पाल यांची नोंद दिसते. गलबतांपेक

Chatrapati shivaji maharaj afjal khan encounter vadh छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा ...!!!  त्या वेळेस स्वराज्य फार काही मोठं नव्हतं. आदिलशहा चे एकेक सरदार महाराजांकडून मारले जात होते. आदिलशहाच्या दरबारात भय होते, शिवबाचा काटा काढण्यासाठी  बडी बेगम ने विजापूर दरबार भरवला आणि विचारले आहे का कोणी तयार त्या शिवा शी लढायला ? दरबारात शांतता पसरली...!! ◆ अफझलखान ने विडा उचलला...!!  तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार उठला आणि म्हणाला मी पकडून आणतो त्या शिवा ला, जातो कुठे तो, जिवंत किंवा मृत. त्याचे नाव अफजल खान होते.  अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्ती ची तोड फोड करत आला.  शिवाजीं महाराजांनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.  अफजल खाना ने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानान