पोस्ट्स

WELCOME

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

इमेज
धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला.. इतिहास बऱ्याच काळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली या भागांकडे धावतो आहे.  या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक प्रचंड असा हा दुर्ग इथे ठाण मांडून बसलेला धुळे भागाचा संरक्षण “किल्ला लळींग” होय. महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ एक मोठे घराणे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला लळींग... लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील इसवी सन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली.  इसवी सन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला.  त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीर खानचा लळींग किल्ल्या खालीच पराभव झाला.   पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता.  इसवीसन

When and where did Hambirrao get the post of Commander-in-Chief. #हंबिररावांना_सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले

इमेज
हंबिररावांना सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले..                     हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव. स्वराज्याच सेनापतीपद मिळणं हे सोपं काम नाही त्या मागे भरपूर घटना घडून गेलेल्या असतात..   ८ एप्रिल १६७४,९ एप्रिल १६७४, १८एप्रिल १६७४ या तीन तारखा आहेत त्या हंबीररावांना सेनापतिपद मिळाले म्हणून फिरतायेत .पण ९ ,१८ या दोन तारखेचा संदर्भ कोठेही आढळून येते नाही..                     त्यात हंबिररावांचे वडील संभाजी मोहिते,आजोबा तुकोजी आणि पणजोबा रतोजी मोहिते हे त्यांच्या काळात लष्करातील मोठया हुद्यावर काम करत होते लष्करी शिक्षनाच बाळकडू हंबीररावांना घरातून मिळालं होत.. पण ते युद्ध भूमीवर दिसलं तरच त्याच फळ मिळत.. ते पुढे हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल. ८ एप्रिल १६७४ हंबीररावांना सरसेनापति पद मिळाले.                उंबराणी ची लढाई १५.०४.१६७३, नेसरीची लढाई २४.०४.१६७४, अफजल खान लढाई, १६६६ नंतर पुरंदर च्या तहात मध्ये गेलेले २३ किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून आपल्या सहकार्या सोबत या स्वराज्याला एकेक विजय मिळवत त्या

#Chatrapati_Sarfoji_raje_bhosale #छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय )

इमेज
#छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय ) छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले तंजावर गादी सांभाळत होते हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांचे दहावे वंशज म्हणजे सर्फोजीराजे भोसले द्वितीय. त्यांनी १७९८ ते १८३२ या काळात गादी सांभाळली. दक्षिण भारतात त्यांनी प्रथम देवनागरी छापखाना काढला. अनेक कलांसहच त्यांना वैद्यक शास्त्राची आवड होती.  ★ औषधांचे उद्यान जडीबुटी लागवड त्यांना केवळ आवड होती असे नव्हे तर त्यांनी आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास केला होता त्यावर एक संकलनात्मक ग्रंथही लिहिला होता. त्यांनी धन्वंतरी महाल उभारला, औषधी उद्यान, औषधी कोठार असे उभारले होते.  औषधी उद्यानात दुर हिमालया पासून कित्येक ठिकाणच्या महत्वपूर्ण वनस्पती गोळा केल्या होत्या. पशु आयुर्वेदावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना ही त्यांनी केली होती.  धन्वंतरी महालात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार चालत असत. हे उपचार केवळ वैद्य व डॉक्टर्स मार्फतच नव्हे तर महाराज स्वतःदेखील नेहमी करत असत. आयुर्वेद, जडीबुटी ,युनानी आणि पाश्चात्य वैद्यकाच्या सहाय्याने डोळ्यांवर उपचार करणे ही त्यांची खासियत होती.  त

#samarbhoomi_umbarkhindit_kartalb_khan_cha_parabhav #समरभूमी_उंबरखिंडीत_कारतलब_खान_चा_पराभव

इमेज
  #समरभूमी_उंबरखिंडीत कारतलब  खान चा पराभव शिवरायांनी उंबर खिंडीत मुगल सरदार कारतलब खान याला चांगलेच झोडपले होते व तो पांढरे निशान हाती घेऊन शरन आला होता. ३०००० मुगल सैन्यानी केवळ १००० मराठा सैन्या समोर शस्त्र टाकली होती. मराठ्यांच्या समोर मुगलांनी शस्त्रे टाकली होती. ३० हजार मुगल सैन्यावर, फक्त १००० मराठा सैन्याने मिळवलेला विजय. शिवरायांनी इथे एक युद्धनीती आखली होती. कारतलब खान हा बोरघाटातुन कोकनात उतरनार होता.  हे शिवरायांना समजताच त्यांनी पेन च्या घाटाखाली सैन्याची एक तुकडीची जमवा जमव केली व ही खबर बहीर्जी नाईक म्हणजेच गुप्तहेर खात्याच्या मदतीने कारतलब खाना पर्यंत पोहचवली. इथे बहीर्जी नाईक यांची ही कामगीरी अतुलनीय आहे.  बोरघाटातुन कोकनात उतरण्याचा हा त्याचा मनसुबा उकळुन पाडण्यासाठी व त्याला कुरवंडा घाटात उतरायला भाग पाडले.  कुरवंडा घाटात ३०,००० मुगल सैन्याला केवळ १००० मराठा सैन्याने गनीमी काव्याने चांगलेच झोडपुन काढले व विजय मीळवला. त्या समई महीला सरदार राय बागन या ही मोहीमेत सामील होत्या. शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्य

107 Shivling installed by Lord Rama in Papanasham temple पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग

इमेज
★ पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग ... तमिलनाडु के तंजौर जिले में स्थित श्री पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग और श्री हनुमान जी द्वारा स्थापित एक शिवलिंग सहित कुल १०८ ऐतिहासिक शिवलिंग हैं.. ये शिवलिंग अतिप्राचीन हैं और भगवान राम के कार्यकाल के हैं..!   मान्यता है कि इन शिवलिंगों की स्थापना भगवान राम द्वारा दैत्यराज रावण के वध से दोषमुक्त होने के लिए किया गया था.  क्योंकि रावण एक ब्राह्मण था इसलिए उसके वध से ब्रम्हहत्या का दोष लग सकता था.  फिर भगवान राम और सीता मैय्या सब अयोध्या आ गये और रामराज्य की शुरुवात हुई.. उसी दिन से दिवाली का त्योहार भी बडी धूमधाम से लोग मनाने लगे.  क्यु की उन सभी के चहिते राजा भगवान राम के आगमन अयोध्या नगरी में हुआ था..!! ★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★ ★ 107 Shivling installed by Lord Rama in Papanasham temple Sri Papanasham temple located in Tanjore district of Tamil Nadu has total 108 historical Shivling including 107 Shivling installed by Lord Rama and one Shivling established by Sri Hanuman ji. These S

May 12, 1666 Chhatrapati Shivaji's historic visit to Agra १२ मे १६६६ छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट

इमेज
१२ मे १६६६ छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट..!! स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.  छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर होते. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला. औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती... अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थ

The second time Surat was looted, Shivaji Maharaj cut off Aurangzeb's nose दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले

इमेज
  दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले...                  सप्टेंबर १६६६ ला शिवाजी महाराज आग्रा कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्या नंतर चा काहि काळ महाराजांनी शांततेत पुर्वी झालेल्या तहा नुसार व्यथित करुन स्वराज्याची घडी आतुन व्यवस्थित बसवली.        शेत सारा पद्धती ठरवली गेली,     सैन्य भरती, किल्ल्यांचा बंदोबस्त व्यवस्थित केला. प्रलंबित निवाडे तंटे मिटवले. व महाराज मिर्झाराजें सोबत अदिलशाहीवर मोगलांकडुन चालुन गेले. अदिलशाही वरील मोहिम आटोपल्यानंतर शिवाजी महाराजांचे विजय पर्व चालू झाले. स.स.१६७० ला शिवाजी महाराजांनी मोगलांना हैराण करुन सोडले. महाराजांना आवर घालण्याचे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न फसत होते. तर महाराज इकडे मोगलांची लांडगेतोड करुन छापे टाकून अनेक किल्ले घेतले. व सुरतेच्या दुसर्‍या लुटिची मोहिम हाती घेतली.  २ ऑक्टो. १६७० रोजी सुरतेत वार्ता येऊन थडकली की, १५००० फौजेसह शिवाजी महाराज सुरतेच्या अलिकडे फक्त २० मैलावर येऊन पोहोचले आहेत.   महाराज सुरतेजवळ आल्याची बातमी ऐकताच शहरातील सर्व व्यापारी व सरकारी अधिकारी यांची एकच पळापळ सुरू झाली.दि. २ ऑ